Posts

'साकारती अंकुर जेव्हा....'

                                                                                                                प्रश्न तयार झाले की, त्यावर उत्तरं तयार करावी लागतात. तरीही, हा खेळ समकाळानुसार पुन्हा-पुन्हा सुरूच राहतो. याला, शोध किंवा संशोधन म्हणायला काहीच हरकत नसावी. मुळात, प्रश्न सगळ्यांनाच सापडतात. पण, त्यांची उत्तरं मात्र सगळ्यांनाच सापडतील असं होत नाही. मग उरतात केवळ दोनच विकल्प. एक तर दुर्लक्ष आणि दूसरा विकल्प म्हणजे, काहीही व्यक्त करून मोकळं होणं. पण, प्रश्न विचारणारे लहानगे असतील तर ? तर, असे खूपच कमी पालक आहेत की, जे आपल्या कौशल्याने आपल्या पाल्याच्या प्रश्नांना सन्मुख ठेवतात ; आणि बाकीचे पालक, एक तर दुर्लक्ष किंवा काहीही उत्तर देवून मोकळं होणं पसंद करतात. आपल्या पाल्याच्या प्रश्नांना सन्मुख ठेवणारे प...

गेम्स - वास्तव आणि आभास.

Image
                                                                                      'खेळ' आपल्या आयुष्यात आला की आपला शारीरिक आणि मानसिक विकास होणारच यात कोणताही प्रश्न नाही. पण, सध्या आभासी जगतानं ,'शरीरासाठी विनासायास' असं तंत्र आणलय. यामुळे मनावर बरे-वाईट असे परिणाम होणार. पण, शरीराचं काय ? शरीरावर वाईट परिणामांची ताकद नक्कीच आपली सत्ता गाजवणार यातही कोणता प्रश्न नाही. बुद्धीला जागृत राहण्यासाठी मानसिकता महत्वाची आहे. तसच शरीराला सचेतन प्राप्त होण्यासाठी हालचालही महत्वाची आहे. ती नसेल तर आणि मनावर वाईट परिणाम होत असतील तर, मानसिक आणि शारीरिक आजार यांना एकत्रितपणे सामोरं जावं लागेल. एक वेळ, कमीत-कमी वयात जास्तीत-जास्त प्रगती होऊ शकेल अथवा अधोगतीही पण, या परिणामांना साथ द्यायला आपलं शरीर ठीक असायला हवं की नको ? मुळात, खेळासाठी वेळापत्रक आखून ठेवणं आणि त्याचा वापर क...

चिरतरुण 'दूरदर्शन'

                                                                                                               साधेपणा आणि आशय समृद्धी यांना, सदैव आपल्या सोबत घेऊन आपल्या वयाची साठ वर्षं पूर्ण करणार्‍या आपल्या, 'दूरदर्शन' ला माझ्याकडून सदाहरित शुभेच्छा आणि अभिनंदन सुद्धा ! दूरदर्शनची सुरवात, त्याचा इतिहास, प्रगतीचे टप्पे, त्यात आलेलं यश-अपयश, आवश्यक असे समकालीन बदल आणि आजचा दिवस याबद्दल सांगण्यासारखं खूप काही आहे. तरीही त्याची मांडणी मला या लेखात करून देता आली नाही याबाबत क्षमस्व ! पण, दूरदर्शन आणि मी यांचं नातं मात्र मला आवर्जून व्यक्त करावसं वाटतं.                                              ...

नव्या क्षितिजाच्या दिशेनं....

                                              काळ बदलत राहणं आणि सतत अतूटपणे पुढे सरकत ठेवणं ही आपल्या सृष्टीची अविरत अशी प्रक्रिया आहे. प्रत्येक सजीवाने आपल्याला लाभलेल्या काळात आपलं आयुष्य व्यतीत करणं म्हणजे त्या सजीवाचा तो समकाळ मानावा लागेल. शोध लागले की जुन्या गोष्टी कालबाह्य होणं अपरीहार्य असतं. तसं ही जुन्या गोष्टी जरा जरी त्रासदायक ठरायला लागल्या की नव्या गोष्टी अंमलात आणून ठेवणं हेही अटळच असतं.                               आपल्या केंद्र सरकारनं खुल्या केलेल्या बहू प्रतिक्षित नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांच्या मसुद्यावर मला काही मतं अभिव्यक्त करावीशी वाटत आहेत. ती मतं, मी अभिप्राय दाखल या लेखात मांडतो आहे.  मुद्दा (अ)                      ५ + ३ + ३ + ४ असा आकृतीबंध मान्य झाल्यामुळे व्यक्तिगत प्रगतीला नक्कीच एक यथा...

परीक्षा कुणाची ? विद्यार्थ्यांची, पालकांची, कि शिक्षकांची ?

                                                      सध्याच्या परीक्षेच्या आणि शिक्षण व्यवस्थेच्या विश्वात सचेतनत्व राखून निरंतरता ठेवण्याचं कार्य हे पालक-विद्यार्थी आणि शिक्षक यांच्याकडेच आहे. बाकीच्या कोणत्याही संबंधित गोष्टी असतील तर त्या या तिघांच्या उपविभागातल्या ठरतात. असं मला वाटतं. पण, मूळ उगमस्थान मात्र कृतिरित्या वरील तिघांकडूनच घडायला हवं. त्याला अनुसरून शिक्षण व्यवस्था ठरवली तर उत्तम ' शिक्षणपीठ ' व्हायला अवधी लागणार नाही.                            आपण नमूद केलेल्या प्रश्नांविषयी सांगायचं म्हंटल तर, ' नापास ' या शब्दाची धारणाच मुळात भीतीच निर्मितीकेंद्र आहे. पूर्वीच्या ' दडपणापेक्षा ' आताच्या युगातल्या ' एकटेपणामुळे ' त्या शब्दातून एक भयानक धास्तीच सतत आसपास वावरत असल्याचं दिसून येतय. मग त्यावर उपाय म्हणून बेकायदेशीर पावलंही टाकली जातात हेही काही कमी नाहीये. त्याम...

जागतिक स्वच्छता दिन २ ० २ ५ .

जागतिक स्वच्छता दिन २ ० २ ५  निमित्त, 'सकाळ-सप्तरंग', ह्या सदराखाली 'फिरस्ती' कार प्रसिद्ध लेखक, श्री. उत्तम कांबळे यांच्या सोबत केलेली लेखात्मक चर्चा आणि उपाय ह्यांचा परामर्श, मी आज आपणापर्यंत 'जागतिक स्वच्छता दिना'च्या औचित्याबदल अभिव्यक्त करीत आहे.  केवळ आपल्या भारतातच नव्हे तर, या जगाच्या कोणत्याही प्रदेशात  स्वच्छता करण्यापूर्वी कचरा होऊ न देणं हेच महत्वाचं आहे. पण,तरीही काही उपाय पुढीलप्रमाणं.  १) सध्या जिवंत असलेला कचरा एखाद्या यंत्रणेमार्फत संपूर्ण नष्ट केला जावा. काही थोडे परिणाम सोसावे लागतील मात्र त्याची तयारी प्रतिकार क्षम असावी आणि काळजीही घेतली  जावी.  २) प्रत्येकाने मन,बुद्धी,शरीर,वेळ आणि पैसा या मूलभूत गोष्टींचा संतुलित विचार करावा. ३) इच्छा बाळगण्यापेक्षा जास्त भर गरजांवर असावा. ४) कचऱ्याचं सुका आणि ओला असं वर्गीकरण करावं. ज्या कचऱ्यापासून खत निर्मिती करता येते तो त्यासाठीच वापरावा. सुका कचरा न जाळता किंवा इतरत्र न फेकता किंवा आपल्या जगन्मातेला उर्फ वसुंधरेला कोणतीही हानी न पोहचविता त्यांचं पुढील प्रमाणे व्यव...

'ती दूर-दूर.....'चा समावेश आता 'काव्यशिल्प' या संग्रहात.

बारामती, दिनांक १७ मार्च २०१७, श्री.विनोद पाटील.                                                                          साहित्यप्रेमी मंडळ आणि साहित्य,कला व संस्कृती मंच सोमेश्वरनगर,बारामती,जि.पुणे यांनी आयोजित केलेल्या 'काव्यशिल्प' या काव्यसंग्रहाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. साहित्यप्रेमी मंडळाचा हा सातवा काव्यसंग्रह ठरला. प्रा.डॉ.जया कदम आणि संस्थापक व अध्यक्ष प्रा.हनुमंत माने संपादित प्रस्तुत काव्यसंग्रहात अनमोल सुतार, 'कवी अन्नू' यांच्या 'ती दूर-दूर......' या कवितेचा समावेश करण्यात आला आहे. तसेच इतर ९९ कवींच्या कविताही या काव्यसंग्रहात समाविष्ठ करण्यात आलेल्या असून सर्व कवींना सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह पारितोषिक म्हणून मंडळातर्फे देऊन गौरविण्यात आले. अशी माहिती 'काव्यक्षण' चे वृत्त प्रसारक आणि सूत्रधार श्री.विनोद पाटील यांनी दिली.               ...