Posts

अंधार जेव्हा होई प्रकाशाचा वैरी

 © Anmol Sutar-Annu.                                                       अंधार आणि प्रकाश खरं तर दोन्हीही परस्परांचे कट्टर विरोधाभास. तसच परस्परां‍साठी तितकेच अनुरूप सुद्धा. परस्परावलंबित्वाचा सिद्धांत अगदी दोघांनाही लागू होऊन राहतो. आता त्याचं सविस्तर स्पष्टीकरण मी या लेखात देत नाही. क्षमस्व ! अनुरूपता जिथं नांदते तिथं विरोधाभास सुद्धा आपली भूमिका अगदी निक्षून बजावतात. त्याशिवाय , संतुलन म्हणजे काय ? याची व्याख्या आपण जाणू शकणार नाही.   पण , बऱ्याच वेळा एखादी गोष्ट शक्य असूनही आपण , त्या गोष्टीला मुद्दाम तर कधी नकळतपणे अशक्य करून ठेवतो आणि होणार्‍या नुकसानीला फार कमी वेळा स्वत:ला जबाबदार धरतो. तसच जास्तीत-जास्त त्या गोष्टीच्या व्यवस्थेलाच कारणीभूत ठरवतो. अशानं सुविधा असून त्यांचा काहीच उपयोग राहत नाही. ज्ञानाच्या अभावामुळे प्रगतीचा आणि विकासाचा आलेख तटस्थच ठरतो किंवा थोड्या प्रमाणात अधोगतीकडेही झुकतो. तशीच सवय लागली तर पुढची पिढी धडपडण्या...

'एका अनर्थाचा गुंता' - It's Complicated ?

                                                                                              ‘इट्स कॉम्प्लीकेटेड’ असं शीर्षक देवून नुकतीच एक नवीन संकल्पना मनात तयार होत असताना त्याच संकल्पनेवर आधारित, ‘न सुटणारा गुंता’ करणाऱ्या अनर्थाची एक घटना या पृथ्वीतलावर प्रत्यक्षात साकार झाली. अशा कितीतरी घटना या जगात क्षणाक्षणाला जन्म घेत असतात. काहींचा कसातरी उचित निकाल लावला जातो. तर, काही घटना तर्क-वितर्काच्या मैदानात खेळत राहण्यातच धन्यता मानतात. काही घटनांचा निकाल लावताच येत नाही. मग उरतो एकच पर्याय तो म्हणजे त्या घटनांना तर्क-वितर्काच्या मैदानात खेळायला लावणं. तेही अगदी आयुष्यभर. काही घटनांवर तर चक्क पांघरूनही घातलं जातं. तर काही घटना जगासमोर येतच नाहीत. पांघरून घातलेल्या आणि...

'द व्हिलन' - 'तो' ही आणि 'ती' ही.

                                                           आचार्य अत्रे यांची आठवण विस्मरणात ठेवणं तसं म्हणायला गेलं तर फारच अशक्य आहे.पण, तरीही गेल्या आठवड्यात त्यांची आठवण नेहमीपेक्षा जरा जास्तच अधोरेखित झाली. त्यांनी त्या काळात त्यांच्या नाटकातून साकारलेला, ‘लखोबा लोखंडे’ आज प्रत्यक्षात अनुभवता आला. यामागेही बरेच, ‘लखोबा लोखंडे’ होऊन गेले असतील. मला ठावूक नसेल. पण, यापुढे तसे, ‘लखोबा लोखंडे’ यदा-कदाचित कधी तयार झाले तरी आपण त्यांना प्रतिसाद देवून आपली फसगत करून घ्यायला नको. इतकीच एक अभिलाषा.                                                सहजपणे जगत असताना नकळत आपण एखाद्या गोष्टीत, व्यक्तीत स्वताला गुंफत रा...

अप्रगत वाटा आणि विश्रांती.

                                                                                                                                                                     काळ कोणताही असो. आपल्या मानवानं स्वताच्या आयुष्यात नेहमीच एक सुंदर असं तारतम्य ठेवण्याचा सतत प्रयत्न केलाय. त्याच्या परंपरांचा वारसा आजही अगदी अबाधितपणे आपलं वर्चस्व सिद्ध करून दाखवतोय. भूतकाळाला तर त्यानं असं जतन करून ठेवलंय की, आजही तेव्हाचा अनुभव आपल्या सर्वाना मार्गदर्शक ठरतोय. यातूनच तर आपला सध्याचा वर्तमान व्यतीत होतोय आणि याच वर्तमानातून आपण भविष्याकडे वाटचाल करीत राहणार आहोत. नवे-नवे शोध लागताहेत त्याच प्र...

'पदोन्नती' तरीही.....

                                                                                      ' आपला माणूस' आपलं आयुष्य जीवंत ठेवण्यासाठी सतत कोणत्या ना कोणत्या तरी प्रेरणांचा वापर करीतच असतो. त्यातीलच त्याला अगम्य वाटावं अशी त्याची एक प्रेरणा म्हणजे ,  त्याचं  ‘ पद ’ . इतर सजीवांमध्ये  ‘ पदं ’  असतात की नाही  ?  हे काय मला ठाव नाही. पण ,  तरीही त्यांची  ‘ पदं ’  ठरविण्याचा प्रयत्न आपल्या या माणसानंच केलाय. याबाबत आज तरी कुणी अजाण राहिलेलं नाहीये.                                                  काही...

'साकारती अंकुर जेव्हा....'

                                                                                                                प्रश्न तयार झाले की, त्यावर उत्तरं तयार करावी लागतात. तरीही, हा खेळ समकाळानुसार पुन्हा-पुन्हा सुरूच राहतो. याला, शोध किंवा संशोधन म्हणायला काहीच हरकत नसावी. मुळात, प्रश्न सगळ्यांनाच सापडतात. पण, त्यांची उत्तरं मात्र सगळ्यांनाच सापडतील असं होत नाही. मग उरतात केवळ दोनच विकल्प. एक तर दुर्लक्ष आणि दूसरा विकल्प म्हणजे, काहीही व्यक्त करून मोकळं होणं. पण, प्रश्न विचारणारे लहानगे असतील तर ? तर, असे खूपच कमी पालक आहेत की, जे आपल्या कौशल्याने आपल्या पाल्याच्या प्रश्नांना सन्मुख ठेवतात ; आणि बाकीचे पालक, एक तर दुर्लक्ष किंवा काहीही उत्तर देवून मोकळं होणं पसंद करतात. आपल्या पाल्याच्या प्रश्नांना सन्मुख ठेवणारे प...

गेम्स - वास्तव आणि आभास.

Image
                                                                                      'खेळ' आपल्या आयुष्यात आला की आपला शारीरिक आणि मानसिक विकास होणारच यात कोणताही प्रश्न नाही. पण, सध्या आभासी जगतानं ,'शरीरासाठी विनासायास' असं तंत्र आणलय. यामुळे मनावर बरे-वाईट असे परिणाम होणार. पण, शरीराचं काय ? शरीरावर वाईट परिणामांची ताकद नक्कीच आपली सत्ता गाजवणार यातही कोणता प्रश्न नाही. बुद्धीला जागृत राहण्यासाठी मानसिकता महत्वाची आहे. तसच शरीराला सचेतन प्राप्त होण्यासाठी हालचालही महत्वाची आहे. ती नसेल तर आणि मनावर वाईट परिणाम होत असतील तर, मानसिक आणि शारीरिक आजार यांना एकत्रितपणे सामोरं जावं लागेल. एक वेळ, कमीत-कमी वयात जास्तीत-जास्त प्रगती होऊ शकेल अथवा अधोगतीही पण, या परिणामांना साथ द्यायला आपलं शरीर ठीक असायला हवं की नको ? मुळात, खेळासाठी वेळापत्रक आखून ठेवणं आणि त्याचा वापर क...