जागतिक स्वच्छता दिन २ ० २ ५ .
जागतिक स्वच्छता दिन २ ० २ ५ निमित्त, 'सकाळ-सप्तरंग', ह्या सदराखाली 'फिरस्ती' कार प्रसिद्ध लेखक, श्री. उत्तम कांबळे यांच्या सोबत केलेली लेखात्मक चर्चा आणि उपाय ह्यांचा परामर्श, मी आज आपणापर्यंत 'जागतिक स्वच्छता दिना'च्या औचित्याबदल अभिव्यक्त करीत आहे. केवळ आपल्या भारतातच नव्हे तर, या जगाच्या कोणत्याही प्रदेशात स्वच्छता करण्यापूर्वी कचरा होऊ न देणं हेच महत्वाचं आहे. पण,तरीही काही उपाय पुढीलप्रमाणं. १) सध्या जिवंत असलेला कचरा एखाद्या यंत्रणेमार्फत संपूर्ण नष्ट केला जावा. काही थोडे परिणाम सोसावे लागतील मात्र त्याची तयारी प्रतिकार क्षम असावी आणि काळजीही घेतली जावी. २) प्रत्येकाने मन,बुद्धी,शरीर,वेळ आणि पैसा या मूलभूत गोष्टींचा संतुलित विचार करावा. ३) इच्छा बाळगण्यापेक्षा जास्त भर गरजांवर असावा. ४) कचऱ्याचं सुका आणि ओला असं वर्गीकरण करावं. ज्या कचऱ्यापासून खत निर्मिती करता येते तो त्यासाठीच वापरावा. सुका कचरा न जाळता किंवा इतरत्र न फेकता किंवा आपल्या जगन्मातेला उर्फ वसुंधरेला कोणतीही हानी न पोहचविता त्यांचं पुढील प्रमाणे व्यव...